शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षांचे ई-मीटर डाऊन ! कोल्हापूर प्रादेशिक परिवहनची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:10 IST

कोल्हापूर : मोठा गाजावाजा करून रिक्षांना ई-मीटर बसविली पण गेल्या सहा महिन्यांत शहरातील बहुतांश रिक्षांचे ई-मीटर डाऊन झाले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना मात्र भुर्दंडरवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये रिक्षांना ई-मीटर बसविणे बंधनकारक साधारणत: एक-दोन वर्षे झाल्यानंतर रिक्षाचालकांनी ई-मीटर पद्धतीने भाडे आकारणी केली; पण,

गणेश शिंदे ।कोल्हापूर : मोठा गाजावाजा करून रिक्षांना ई-मीटर बसविली पण गेल्या सहा महिन्यांत शहरातील बहुतांश रिक्षांचे ई-मीटर डाऊन झाले आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसत असून एकाच मार्गावर धावणाºया दोन रिक्षांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या डोळेझाकपणाचा नाहक त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

रिक्षा व टॅक्सीचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये रिक्षांना ई-मीटर बसविणे बंधनकारक केले. भाडे आकारणीत सुसूत्रता येऊन प्रवाशांना योग्य दरात प्रवास करता यावा, हा त्यामागचा उद्देश होता. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिका व ‘अ’ वर्ग नगरपालिका हद्दीतील रिक्षाचालकांना ई-मीटर सक्तीचे केले.

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाकडे सन २०१४ पर्यंत जिल्ह्यातील ५८८१ जुन्या रिक्षांना ई-मीटर बसविल्याची नोंद आहे. मात्र, सन २०१५ नंतर नवीन रिक्षांना कंपनीकडूनच ई-मीटर बसवून त्याची विक्री होत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगितले.दरम्यान, सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून सन २०१४ मध्ये शहरातील लोकप्रतिनिधींनी रिक्षाचालकांना ई-मीटर मोफत दिली. त्यामुळे रिक्षाचालकांचा ई-मीटर घेण्याचा प्रश्न मिटला. साधारणत: एक-दोन वर्षे झाल्यानंतर रिक्षाचालकांनी ई-मीटर पद्धतीने भाडे आकारणी केली; पण, कालांतराने काही रिक्षाचालकांनी ई-मीटर बंद असल्याचे सांगून ठरवून भाडे आकारण्याची पद्धत सुरू केली. हळूहळू ही पद्धत रूढ होत गेली. परिणामी, एकाच मार्गावर, एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जाऊ लागले. काही रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे प्रामाणिक रिक्षाचालकही बदनाम होऊ लागले आहेत. शहरात सुमारे १० हजारांवर रिक्षा धावतात. सद्य:स्थितीत त्यातील बहुतांश रिक्षाचालकांकडून ई-मीटर बंद असल्याचे कारण सांगितले जाते. त्याचबरोबर रात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत रिक्षाचा असलेला दीडपट आकार हा रात्री साडेअकरा वाजल्यापासून आकारला जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांमधून होत आहेत.‘आरटीओ’ विभाग करतोय काय?वास्तविक, तपासणीवेळी रिक्षाच्या सर्व बाबी तपासणे ही प्रादेशिक परिवहन विभागाची जबाबदारी आहे. कोणत्या रिक्षांना ई-मीटर आहे, कोणत्या नाही याची माहिती संबंधित अधिकाºयांनी प्रशासनाला देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग करतो तरी काय ? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे. 

शहरातील ९० टक्के रिक्षाचालक ई-मीटरची अंमलबजावणी करतात; पण, काही रिक्षाचालकांकडून ई-मीटरची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होतात. जास्त दर घेतल्यास प्रवाशांनी पोलीस अथवा ‘प्रादेशिक परिवहन’कडे थेट तक्रार करावी.- राजेंद्र जाधव, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना,कोल्हापूर.ई -मीटर पद्धतीने रिक्षाचालकाकडून भाडे घेतले जात नसेल तर प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे थेट लेखी तक्रार द्याव्यात. त्यावर निश्चित कारवाई करू. -डॉ. एस. टी. अल्वारिस, उपप्रादेशिक परिवहनअधिकारी, कोल्हापूर.

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळPoliceपोलिस